प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........

Dec 13, 2007

वाटा ... (गझल)

कोणास कधी कळतात वाटा
वेड्या कोठून कश्या वळतात वाटा।

एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना
सोडूनी हात कधी पळतात वाटा।

पाहीले मी , सरणावर स्वंप्न होते
जाळूनी स्वंप्न अश्या जळतात वाटा।

पाहूनी त्या वळणावर आसवांना,
काळोखाआड कधी गळतात वाटा।

कोणी बोले दुनिया तर गोल आहे
फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा?

तीही सोडून मला वळनात गेली
तीच्या वाचून मला छळतात वाटा।

हो येथेच सुरवात , इथेच अंत
(कीती प्रवास असे गिळतात वाटा।)

सुधीर ......

मनापासुन ......... मनापर्यंत ........

शून्य... (गझल)

आयूश्य धुडांळत झरला शून्य होता
एका ह्र्दयावर हरला शून्य होता।

तोडून बधं मिठितुन तीच्या सूटावे
तीने मुठित जणु धरला शून्य होता।

मैफ़ील सपंवुन उपडया पेल्यातून,
काळोख धुडांळत उरला शून्य होता।

जून्या जखमा तुटुन अश्या आल्यावर
पून्हां अश्रुनी जणु भरला शून्य होता।

पाहून अखेर जिवन त्या राखेपाशी
आता सरणावर सरला शून्य होता।

तेव्हां ति जरी विसरुन गेली शून्यास
तीच्या नयनात उतरला शून्य होता।

सुधीर ....

मनापासुन ...... मनापर्यंत ......

Nov 30, 2007

किनारे. (गझल)

सागरी मीठीत हळुच शिरले किनारे
आसवे गाळून परत फ़िरले किनारे.

आयुष्यात एकरुप असुन सागराशी
दुष्ट लाटांनी हसत उधळले किनारे.

मीठ चोळूनी हळूच लहर फ़ीरली ती
शेवटी कीचांळत तडफ़डले किनारे.

वादळाच्या मीठित जणु उरलाच वारा
सागरा घेऊन कुशित निजले किनारे.

साउलीसाठी जिव गुदमरला उन्हांत
संपण्याआधीच जिव हरले किनारे.

आज येऊदे प्रलय अचल मी उरेन
ठोकुन छाती मग गडगडले कीनारे.

पापण्यांती घेउन जखम जगी जगलो
निवडूंगा पाहुन कुजबुजले किनारे.

सुधीर ...........

मनापासुन ............ मनापर्यंत ............

डोळ्यात गळून गेली (गझल)

वृत्त - इंद्रवजा गण - त त ज ग ग
****************************

आत्ताच डोळ्यात गळून गेली
जी आठवांना विसरून गेली.

होते अश्रू नीकट काळजाच्या
डोळ्यात सारे भिजवून गेली.

मी जागुन आयुष्य काढलेले
ही रात्र झोपेत गिळून गेली.

होतो मि तीथेच समोर तीच्या
ती मान मागे वळवून गेली.

हा दोष मी आज कुणास द्यावा
दोषी मला ती ठरवून गेली.

शब्दास आता रडु आवरेना
काव्यास माझ्या रडवून गेली.

झालो मि आता निवडूंग वेडा
तीही गुलाबात दगूंन गेली.

सुधीर ...

मनापासुन ........ मनापर्यंत ............

सरलो नभात (गझल)

वृत्त - इंद्रवजा गण - त त ज ग ग
****************************

आयुष्य होते उरलो नभात
सा-याच राती सरलो नभात.

तो मीच तारा नभि तूटलेला
तूझ्याच साठी तुटलो नभात.

तो चंद्र तुला फ़सवून गेला.
असाच मीही फ़सलो नभात.

हो आज तीही विसरून गेली
पाहून वाटा बसलो नभात.

ती एक आशा मज चादण्यांची
मी चादण्यांशी हरलो नभात.

दिला कधी ना नियतीस दोष
मी नीवडूंग जगलो नभात.


सुधीर ...........

मनापासुन ............ मनापर्यंत ............

सरणात होतो (गझल)

वृत्त - उपेंद्रवज्रा , गण - ज त ज ग ग
***************************

निवांत माझ्या सरणात होतो
नितांत तीच्या स्मरणात होतो.

भवीष्य माझे भरडून गेले
मि नीयतीच्या दळणात होतो.

उधाण लाटा उधळून गेल्या
मि वादळाच्या वळणात होतो.

उशीर झाला कळण्यास तीला
कळाल तेव्हां मसणात होतो.

भरून गेल्या जखमा कधीच्या
उरून मी फ़क्‍त वणात होतो.

फ़िरून वाटा ह्र्दयात वेडया
अखेर तीच्या चरणात होतो.

सुधीर ....

मनापासुन ............ मनापर्यंत ............

ह्र्दयात नकार होते (गझल)

तीलाच द्याव मन हेच विचार होते
तीच्या निशब्द ह्र्दयात नकार होते.

ती दोष देउन जरी नियतीस गेली
माझे तिच्याहुन नशीब सुमार होते.

कर्जात बूडुन पुर्ण जगलो असाच
आयुष्य जणु नुसतेच उधार होते.

तीला अर्थ समझला हसण्याचा जेव्हां
आले गळुन नयनात तुषार होते.

अश्या अनेक ह्रदयात निवास तीचा
माझेच ते ह्र्दय जणू चुकार होते.

काळोख तो सहज नशेत तोल गेला
झाली सकाळ तर तेच गटार होते.

आता कुठे लपवु ओघळत्या अश्रुंना
माझे अश्रुच गळण्यात हुशार होते.

सुधीर ...........

मनापासुन ............ मनापर्यंत ............

काव्यात

कस ओळखाव मी काय तुझ्या मनात आहे
कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.

नजरा मिळवण्या आधीच नजर चुकवतेस तु
कसे ओळखावे कोणते शब्द बंद ओठात आहे.

मी शोधतो जागा माझी सदा तुझ्या भोवताली
पण हे मात्र खर की तु माझ्या काळजात आहे.

सा-या जरी बंद वाटा माझ्या मुक्या शब्दांच्या
परी तु समजुन घे आयुष्य माझ तुझ्यात आहे.

तुला मागुही शकत नाही मी आज तुझ्यापासुन
प्रश्न कोणताच नाही सार काही तुझ्या उत्तरात आहे.

हो आज या नात्याला नाव अस कोणतच नाही
आणि कशाला हव नाव अस काय नावात आहे.

मला फ़क्‍त तु हवी आहेस आणी तुझा श्वास
श्वासाशिवाय जगणा-या काय या देहात आहे.

कधी तरी सागं भावना पोहचल्या मनापर्यंत
कळालच नाही तर काय अर्थ या काव्यात आहे.

सुधीर ...........

मनापासुन ............ मनापर्यंत ............

ती आली

होउन गारवा आयुष्यात ती आली
घेउन सुखांची बरसात ती आली

मी तर पाकळ्यांची आस केली
बनुन सडा पारीजात ती आली

रस्ता चालत होतो काट्यांचा जेव्हां
सोडून तीची पाउलवाट ती आली

बुडता बुडता किनारा गवसला मला
होऊन माझा आधार लाट आली

आसवात होतो कधी मी चिबं भिजलेला
घेऊन मग मेघातुन बरसात ती आली

आजवर या कुट्ट काळोखात जगलो
होउन प्रकाश घरी साजंवात ती आली

आसवात कधी आभाळ पाहील नाही
उधळून चादंण्यात चादंरात ती आली

कोण म्हणे मी भगांर भगांरात जगलो
रगंवुन रांगोळी माझ्या दारात ती आली

हा एक निवडूंग वाळवटांत होता एकटा
होऊन हिरवळ या श्रावणात ती आली.

सुधीर ......

मनापासुन ...... मनापर्यंत ......

निर्दयी ...

तुझ्या शिवाय हे आयुष्य कुठवर होत
माझ सार जिवन तुझ्याच नावावर होत

तु गेलीस तेव्हां घरानेही श्वास रोखलेला
तुझ्या आठवणीचं वादळ माझ्या घरावर होत.

गुदमरत होता बेभान वारा अगंणात माझ्या
कधी तु माळलेल गुलाब त्या दारावर होत.

तो मेघही वेडा आज उगाच बरसुन गेला
आधीच आसंवाच पाणी माझ्या गालावर होत.

असाच कोलमडुन पडला घराचा तो कोनवासा
तुझ्या विरहाच ओझ त्याच्याही मनावर होत.

शेवटी शोधला एक कोपरा निवांत असलेला
तोही ओघळला त्याचही प्रेम तुझ्यावर होत.

मीही कसा जाउ सोडून तो घराचा पसारा सारा
निघालो तर दिसलं तुझच नाव दारावर होत.

कुपणांत म्हणे काल निवडूंग कुजबुजत होता
त्याचही खुप प्रेम त्या निर्दयी अगंणावर होत.

सुधीर ..........

मनापासुन ............ मनापर्यंत .............

डोळ्यातून ओतलो इथे.

आज होऊन तमाशा मीच जगलो इथे
राहीलो एकटा सगळ्यास मुकलो इथे.

राहीली ताट मान त्या मोठ्या मनाची
मी तर कणा मोडलेला सदा वाकलो इथे.

आता कुठे सुरवात म्हणे झाली सुखांची
त्या सुरवाती आधीच मी तर संपलो इथे.

होती आशा मला वादळास मिठीत घेण्याची
तीच्या इवल्याशा श्वासात मी गुतंलो इथे.

ना कळाल्या तीच्या भाषा ना कळाल्या दिशा
मी वाट चुकलेला असाच भरकटलो इथे.

मागे वळून पाहता शुन्य होता सोबतीला
दमडीच्या मोलाने भगांरात विकलो इथे.

कोणी आल होत दुःखं विकत घेण्यासाठी
मी घेउन टोपली मग बाजारात बसलो इथे.

हो असच संपल जीवन उद्याच्या प्रतिक्षेत
उद्यासाठी आजचा प्रत्येक क्षण मुकलो इथे.

काल म्हणे तीला खरच माझी आठवण आली
आठवणीत तीच्या मग मीही डोळ्यातून ओतलो इथे.

सुधीर .....

मनापासून ........... मनापर्यंत ............

मी आभारी आहे ....

तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे
कीचांळत्या जखमांसाठी मी आभारी आहे.

कुठे होता खिशात रुमाल माझ्या कधी
तु दिलेल्या आसवांसाठी मी आभारी आहे.

कुणाचा हा प्रवास कधी पुर्ण झाला आजवर
तुझ्या त्या चार पावलांसाठी मी अभारी आहे.

आज रात्र जाते चादंण्या मोजण्यात माझी
कधी तु दिलेल्या स्वप्नांसाठी मी आभारी आहे.

आजवर किनाराच माझ्या नशीबात होता
तुझ्या त्या सागर लाटांसाठी मी आभारी आहे.

आयुष्य तुझे रंग पाहण्यात गेले माझे
तु बदलेल्या रगांसाठी मी आभारी आहे.

काल तो रस्ता ही म्हणाला सांग तिला
तु दिलेल्या वळणांसाठी मी आभारी आहे.

अगंण कानात कुजबुजुन गेल रात्री, म्हणे
न तुटणा-या गुलाबांसाठी मी आभारी आहे.

मी शब्दांचा सौदागर म्हणून जगलो सदा पण
तु दिलेल्या त्या शब्दांसाठी मी आभारी आहे.

आज हा निवंडूग ह्या शब्दात ळॊळतो सदा
तु दिलेल्या ह्या छदांसाठी मी आभारी आहे.

सुधीर ....

मनापासुन ........... मनापर्यंत ...........

फ़क्‍त तुझ्यासाठी .

हा जीव सरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी
हा दगड पाझरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

ठोके काळजाचे आजही चुकतात अधुन मधुन
कधी श्वास गुदमरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही मी त्या वाटा चुकतो कधी तरी
तेव्हा रस्ता बदलला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तेव्हां तुला पावसाची ओढ लागे सदा काळी
ग्रीष्मात मेघ बरसला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझी प्रित सदा त्या उसळत्या लाटांवरी
हा किनारा झरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

आजही तु म्हणे लाल हात रंगवतेस कधी
तेव्हां माझा रंग उडाला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

फ़ार मोठा इतिहास तुझ्या छोट्याश्या प्रेमाचा
तो मी शब्दात कोरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

सारच मी जिकंत आलो आजवर पण
मी हा जुगार हरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी

तुझ मोठ होण्याच स्वप्नं होत म्हणूनच
हा निवडूंग बहरला होता फ़क्‍त तुझ्यासाठी.

सुधीर ......

मनापासुन ........ मनापर्यंत .........

सार गाव ......

आज सार गाव माझ्यावर हसत होत
प्रत्येकजण पाहून तोडं वळवत होत.

प्रेम केल ही एकच चुक होती माझी
मी काय करू प्रेम तर नकळत होत.

काल आरश्यात पाहताना बर वाटल
कोणी तरी घरात मला ओळखत होत.

कुणा दिसल्या नाहीत जखमा मझ्या
वेदनेतुन एकटं काळीज ओघळत होत.

धुर कसा विझणार आग विझली तरी
सार स्वप्नं माझ त्या धुरात जळत होत.

चुल कशी पेटवू जेव्हां पेटेनाच निखारा
मग कळाल तीच्यासाठी घरही गळत होत.

त्या प्राजक्‍तासही झॊप नाही आली कधी
तेही तुझ्यासाठी रात्र भर सळसळत होत.

आजवर नव्हतो झालो नापास मी कधी,
पण पुस्तकाच एक एक पान निकळत होत.

आता हा निवंडूग जगतो एकटा वाळवटांत
काय करू भविष्य ह्या उनात तळपळत होत.

सुधीर ....

मनापासुन ........... मनापर्यंत ...........

बघ भगत आज तुला पुन्हां फ़ाशी

बघ भगत आज तुला पुन्हां फ़ाशी
अफ़झलसाठी कोणी मागतय माफ़ी

तुझ्यावेळी त्यांनी गच्च डोळे मिटले
क्रातींकारी म्हणून तुला दुर लोटले
अहिंसेचे ते पुतळे तेव्हां पुरते झोपले
अफ़झलसाठी मात्र तत्व सोडुन नाचले

तुही तेच केल होत जे त्याने केल
तु देशासाठी केल त्या देश द्रोह्यांसाठी
तेव्हां तुला मिळाली फ़ाशीची क्षिशा
त्याच्यासाठी मागतात माफ़ीची दिक्षा.

म्हणे बेकार तुझा आत्मा होता
देशात तो एकच महात्मा होता
असा जागतेपणे डोळे झाकणारा
तोच ना आमचा पिता होता.

त्याचेच भक्त आज असे वागतात
त्याच्या विचारांना मातीत पुरतात
तुझ्या बलिदानाला दिलि मुठ माती
अफ़झलची करणी म्हणे एक चुक होती.

माझ्यासाठी तु एकच महात्मा
किचांळतोय क्रांतीचा प्रत्येक आत्मा
अहींसेच्या पुतळ्यांनीच केला आहे
या देशात क्रांतीच्या विचारांचा खात्मा.

तुझा इतिहासा अर्धा पानात लिहिला
या देशात क्रांती विरांचा इतिहास हरवला
कोणाला कळाल नाही क्रांतीच बलीदान
तोच अहीसेचा धडा ह्या पुस्तकांनी गिरवला.

बघ भगत आज तुला पुन्हां फ़ाशी
अफ़झलसाठी कोणी मागतय माफ़ी

सुधीर .....

Mar 24, 2007

मी तिच्यात नव्हतो


मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती


मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती


तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती


तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती


तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.


नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.


तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती


तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती


आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.


मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती.



सुधीर ....

मनापासुन ........ मनापर्यत. .......

संपलो नाही कधीच


संपलो नाही कधीच मी पुरून उरलो होतो
विझलो नाही पुन्हां मी विझुन पेटलो होतो


तुझ्या श्वासाने झालो मी पुन्हां निखारा
त्या राखेत कोळसा मी बनुन पडलो होतो.


तुला वाटले माझी राख झाली ती कधीची
धुरावाटे त्या आभाळास मी भिडलो होतो


कोसळला नाहि तो पहीला पाऊस तेव्हां
पावसाआधी ढगातुन त्यावेळी मी बरसलो होतो


स्वखुशीने तुही भिजलिस सरीत आसवाच्यां
तुझ्या खुशीसाठी मी डोळ्यात साठलो होतो


तुला जाण नाही आसवाच्या चवेची आजही
तो सागर नव्हता त्यात मी विरघळलो होतो.


गंध होता हवेत माझ्या अस्तित्वाचा नेहमी
श्वासावाटे तेव्हां तुझ्या मी काळजात शिरलो होतो.


तुला वाटले मी दुर गेलो आता भेट नाही
मनात डोकावल नाहीस मी मनात मुरलो होतो


जेव्हां ओघळलीस तु... डोळ्यावाटे मीही मुक्‍त झालो
इतके दिवस तुझ्या मी डोळ्यात उरलो होतो.


नेहमीच राहीन जिवंत असा तुझ्या आठवणीत
देह संपला तरी तुझ्या मी देहात साठलो होतो.


तु कणा कणात शोधलस मी क्षणा क्षणात होतो
अगं कुठेच गेलो नव्हतो मी तुझ्यात सरलो होतो.



सुधीर ....

मनापासुन ....... मनापर्यंत .......


Mar 13, 2007

बरसलो आज शब्दांतुन


मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी
मी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.

सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.

तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्या
मी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.

आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.

सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या
मी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.

मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी
मी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा
मी चाललो स्वप्न मोडुन , तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी.

सुधीर .....

मनापासुन ....... मनापर्यंत .......

नियतिने सुड हा


मडंळी ही कविता त्या हजारो शेतक-याची कथा आहे
ज्यांनी देहाला सपंवले तरी आत्म्याला शांती नाही.....

आता मी सुटलो आता माझ्या संसारी नाही
आता मी सुटलो आता मी कर्ज बाजारी नाही
आता मी मुक्‍त आहे पण तरी झॊप नाही
माझ्या लेकरांना कोणी इथे कोणी बाप नाही

फ़ाटलं आभाळ सार पण पाण्याचा थेबं नाही
कधी साडंल तर इतक साडंल की थाबांयच नाव नाही
माझी धरणी माय माझ्या म्रृत्यूला कार झाली
कधी पाण्यासाठी कधी भरपाण्यांत बोलायची सोय नाही

सर्जा राजाही माझे उपाशी मग मी का भाकरी खावी
देणेकरांची वरात तलवारीसह रोज दारात माझ्या यावी
आता सरकारी येतात आनिक पचंनामा करुन जातात
आत्म्याच्या मोलाची जाण नाही त्यांनी देहाची किमंत करावी

ती ही रडते आहे पाहून माझ्या सुकलेल्या कणसाकडे
शाळा शीकायचि होती आता जातो तो कोरड्या मळ्याकडे
ती चिमुलकली माझी रोज विहीरीत त्याच डोकावते
बाप गेला तिथुन येइल म्हणून एकटक डोळे तिचे रहाटाकडे.

आज मेल्यानतंरही मि असा कर्जात माझ्या बुडालेला
मुक्‍तीसाठी हा जिव माझा त्या आभाळात उडालेला
सरकार म्हणते कारण दुसरच होत माझ्या आत्महत्तेच
ही माझीच कहाणी नाही कितीकांवर नियतिने सुड हा उगावलेला.

सुधीर ........

तो रस्ता मला पाहून


तो रस्ता मला पाहून आज हसला
म्हणाला प्रेमात बिचारा फ़सला
हो ती हवा आजही तिथेच होती
नेहमी तुझे केस विसकटणारी

तो गाडयाचां गलकाही तिथे होता
रोज तुझ्या माझ्या वादंवर हसणारा
त्या वळणाने मला आवाज दिला खरा
पण आज मी मागे वळून पाहीलच नाही

रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या
आज कोणी माझ्याकडे पाहीलच नाही
आज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मला
आज सारखं चुकल्या सारखं वाटत होत

पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी
आज एक युदध हरल्या सारख वाटत होत
आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकच
रोज दोघं असतात पण आज हा एकच

उत्तर होत जरी एकटाच असलो तरी
तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला
पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज
असतेच ना सागराच्या भरती आहोटीला...

सुधीर .....

नापासुन ......... मनापर्यंत .........

तिने श्राप दिलाय


माझ्या कविताना तिने श्राप दिलाय
की त्या नेहमी अश्याच रडंत रहतील
तो श्राप वरदान ठरलाय माझ्यासाठी
कविता रडल्या तरी डोळे शातं रहतील.

माझ्या कवितंना तिने श्राप दिलाय
की त्या कधीच पुर्ण होणार नाहीत
आज त्या पुर्ण करण्यात वेळ जाते
तुझी आठवण तरी मला येत नाही

माझ्या कवितानां तिने श्राप दिलाय
की त्या कधी कोणाला आवडणार नाहीत
तो श्राप वरदान ठरलाय माझ्यासाठी
सगळ्यानां कळाल तु मला फ़सवल ते
आणी खरोखर ते कोणालाच आवडलेलं नाही

सुधीर ...........

मनापासुन .......... मनापर्यंत ...........

यदां तरि आणा तो


आता पुन्हां आशा आम्हांला त्या स्वप्नांची
भारत जिकेलं विश्व कप ही आस्था या मनाची
आता पुन्हां आम्ही करणार तेच मागचे दावे
काही होऊदे गेल्या वेळी जे झाले ते झाले.

लागली वादळाची चाहूल मनास थांग नाही
पाहुन आमचि तयारी बोलायचि सोय नाही
सारे महारथी आमच्याकडे अर्जुनासारखे
मागे वळू नका आता मागे पहायचे नाही

भले आमचे मन खुपदा इथे तुटले
आम्ही तुम्हांला सांगा कधी एकटे टाकले
आता लढायचे मन लावुन तुम्ही इथे
काही होऊदे उद्या आभाळ जरी हे फ़ाटले.

तुम्ही पैसा कमवा आम्हांला काही नाही
तुम्ही नाव मिळवा आम्हांला खंत नाही
एकच इच्छा आमच्या ह्या भोळ्या मनाची
काही झालं तरी आम्हांला यंदा हरायच नाही

अडीचशे करोड हात करतील प्राथना इथे
मिळेल तेहत्तीस कोटीचा आशीर्वाद तिथे
त्यांची लोक सख्यां नाही तेवढे देव आमचे
जिकणारं ना तुम्ही नवस करणांर आम्ही इथे

क्रुपा करा पण यदां तरि आणा तो विश्वकप
नाहीतर म्हणेल भारताला स्वप्नांळू जग
शेवटी आमच स्वप्नंही तुमच्याच हातात
मन तोडू नका आता नाहीतर बघा मग...

सुधीर ........

रंग बदलेस म्हणून


उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे
उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे
मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे
ततुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे.

उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस
उद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस
आजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची
उद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांर नाहीस

"सणाला तरी हसत जा" तु अस म्हणशील"
बाहेरच जग पाहत जा" तु असही म्हणशील
"कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण
तु मात्र सुखाने जगत जा" तु असही म्हणशील.

पण यदाच्या होळीला मी ही भिजेन म्हणतोय
यदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन म्हणतोय
आठवतय एकदाच रंगलो होतो तुझ्या रंगात आता
तुही रंग बदलेस म्हणून शब्दरंगात जगेन म्हणतोय.

सुधीर ....

मनापासुन ....... मनापर्यंत ........

तो क्षण निघून गेला


तो क्षण निघून गेला मी पाहतच राहीलो
बोलायच खुप होत पण निशब्द झाहलो
सारे शब्द जणू रानोमाळ पळून गेले माझे
ओठ उघडलेच नाही डोळ्यात विरघळत राहीलो.

तु समोर होतीस मी कोपरा शोधत रहीलो
तु वळून पाहत होतीस मी वळत राहीलो
आज कळाल कीती कठीण असत प्रेम
काही सपंवुन गेले मी सुरु करण्यात राहीलो.

तुझे डोळे बोलत होते मी पपण्यांत राहीलो
तुझे इशारे खुणवत होते मी बघण्यात राहीलो
कोणीही त्या संधीच सोन केल असत आज
मी 'सोन्या' सोन्यासाठी संधी शोधत राहीलो.

वेळ जात राहीली मी आज वाहत राहीलो
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीलो
तु माझ्या काळजात सामावुन गेलीस सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीलो.

सुधीर .....

मनपासुन ...... मनापर्यंत .......

एक लढाई हरलो


एक लढाई हरलो म्हणून काय झालं
अजून युद्ध जिकंण तरी बाकी आहे
आज मागे पडलो म्हणून काय झाल
बरेच जण आज माझ्याही मागे आहेत.

कोण म्हणत "ती नाही म्हणून काय झाल
"तिच्या शीवाय इथे ब-याच जणी आहेत"
पण यालाच प्रेम म्हणतात का जगात
तु घाबरु नकोस मी आजही तुझाच आहे.

तु जवळ नसलीस म्हणून काय झाल
तुझ्या आठवणी माझ्यासाठी खूप आहेत
पण आठवणीसोबत जगता येत का इथे
खरच आज हे एक खूप मोठ गणित आहे.

आज मी तुझा असलो म्हणून काय झाल
पण आज तु नक्की माझी आहेस का ?
मी पळवाटा मुळीच शोधत नाही कधी
हा पण तुझे सगळे मार्ग मोकळे आहेत.

सुधीर .......

मनापासुन ....... मनापर्यंत .........

आज झाली पुन्हां माती


आज झाली पुन्हां माती ही जड
आज ओलावली पुन्हां पापण्यांची कड
माझ्या शब्दांनी सुध्दा तिचे डोळे भिजले
आसवांसाठी ही आशी काळजाची तडफ़ड.

आज भिजला पुन्हां तो चद्रं तो माझा
अश्रुंच्या चादंण्यात मग झाला तो वजा
नाही लपवु शकला स्वतःला तो आज
मग घेतली त्याने काही वेळेची रजा

दुःखं समजायला आसवांची का गरज
शब्दही सांगतात आणखी काही बरचं
कस पेलणार वजन शब्दांच त्या मनाला
जड झाली होती माती आज खरंच

सुधीर .....

मनापासुन ......... मनापर्यंत .........

मी देईन कधी हाक


मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?

खूप अडखळीची आहे वाट ही
कधी काट्यांवरी पडेल टाच ही
धडपडताना ह्या खडतर वाटेवर
सांग हात मला तु देशील ना ?

तुझ्या प्रितीचा आहे ध्यास मला
तुझ्या भेटीची आहे आस मला
कधी एकटेपणाचा होईल भास मला
सांग साथ मला तु देशील ना ?

कधी रागवेन मी तुझ्यावरती
कधी भांडेन मी तुझ्या संगती
कधी येईल दडपण या मनावरती
सांग कुशीत मला तु घेशील ना ?

मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?

सुधीर .....

मनापासुन ......... मनापर्यंत .........

राहीलयं काय आता


लाख वाटल लपवाव जगापासुन या मनाला
तरीही आज तुझी कहाणी कळाली या जगाला
सगळ्यांनी वाचल दुःखं या प्रत्येक शब्दांतुन
काय लपवु राहीलयं काय आता लपवायला.

लाख मन सागंत होत कुठेतरी थाबांयला
वळण निघुन गेली नाही जमल वळायला
सारेच धावले एकदम सुखाच्या मागे
मी काय करु मला नाही जमल पळायला.

आज काय झाल तुला उगाच असं रडायला
कुठे चुकल्यासारखं नाही ना वाटत मनाला
अशी कीती सुखं तुझ्या पदरात पडली
जी कारणं होती तुझी तेव्हा मला सोडायला.

आजही कुठे जमतय मला तस जगायला
एक वणवा कमीच होती मला जळायला
कालच्या पुरातून कसाबसा वाचलो मी पण
डोळ्यातल्या पाण्यात नाही जमत पोहायला.

सुधीर ......

मनापासुन............... मनापर्यत..................

एक आठवण चाळून घे


नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.

जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे

आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे

नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.

सुधीर ........

मनापासुन ........ मनापर्यंत .......

Feb 8, 2007

निशब्द


मी दिल्या शब्दा असंख्य हाका शब्द ना मागे वळला कधी
शब्दासाठी झाहलो शब्द्खुळा शब्द ना मज मिळाला कधी
शब्द सकाळ, शब्द मध्यान, शब्द सांज, शब्द निशा कधी
मी गाळली असंख्य आसवे पण शब्द माझा ना पाझरला कधी.
शब्दासाठी हा सारा प्रयास पण शब्दा तो ना कळला कधी


शब्दासाठी हा धडपडता प्रवास पण हात शब्दाने ना धरला कधी
शब्द सागर शब्द कीनारा शब्द वारा मग शब्द वादंळ कधी
मला मिळाल्या असंख्य ठेचा पण शब्द माझा ना ओघळला कधी.
शब्दात माझा जिव गुतंला पण जिव शब्दचा ना जडला कधी


मी लिहील्या असंख्य कविता पण शब्दा त्या ना कळळ्या कधी
शब्द जिवन शब्द संसार शब्द अस्तिव्त शब्द कविता कधी
झालो मी आज निशब्द कवि पण शब्दा हा कवि ना कळला कधी.
आज जिवन माझं प्रश्नचिन्हं पण शब्दास हा प्रश्न ना पडला कधी


शब्दाच्या ओजंळीत श्वास माझा शब्दाने हा जिव ना सोडला कधी
शब्द साउली शब्द आधार शब्द आयुश्य शब्द सर्वस्व कधी
शब्दासाठी मी नेहमी शून्यच होतो पण हा शब्द मी ना खोडला कधी.


सुधीर ......

मनापासुन............... मनापर्यत..................

आसवांचे दिवस आलेत.


कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतो
आता अश्रुंवर प्रेम करण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती माझी घर बसवण्याची
बघ आज माझे घर सोडण्याचे दिवस आलेत.

कधी काळी मी तुझ्यावर मरत होतो
आता खरोखर मरण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती मरणं आजमवण्याची
बघ आज इच्छा पुर्ण करण्याचे दिवस आलेत.

कधी काळी माझ्या कविता हसत होत्या
आता कवितांवर रडण्याचे दिवस आलेत
कागदावर माझ्या शब्दांशीवाय काहीच नव्हते
आज शब्दांसोबत अश्रुंचे डागही आलेत.

कधी मनापासुन मनापर्यंत पोहचत होतो
आज डोळ्यातुन ओघळण्याचे दिवस आलेत
तुझ्या सोडून सागळ्याच्यां डोळ्यात आसवे आहेत
बघ आज तुझ्या सुखाचे नाही माझ्या आसवांचे
दिवस आलेत.

सुधीर .....

मनापासुन ........ मनापर्यंत ........

नाव बुडण्याआधी


नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय या सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.

जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे

आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे

नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.

सुधीर ........

मनापासुन ........ मनापर्यंत .......

प्रेमात दुःखाचे महल


प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मी
ते एक मन ज्याला दगड बनवले मी
कधी कोणी दुखवु नये तुला माझ्यामुळे
म्हणून जगापासुन तुझे नाव लपवले मी.

ज्या आसवांनी या रत्रीनां जागवले मी
ते दोन डोळे ज्याना नेहमी रडवले मी
पण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेत
म्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी.

तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी
आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी
उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही
म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी.

तुझ्या विरहांत उगाचच शब्दांना सतवले मी
तुझा इतिहास लिहिताना कवितांना रडवले मी
तुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजाव लागत
म्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी.

सुधीर ..........

मनापसुन .......... मनापर्यंत .............

कीती पाखंरे जळाली


कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी
की ज्योत जळण्यासाठी आहे की जाळण्यासाठी
रडणा-या तुला रडण्याचा अर्थ कुठे माहीत
अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी.

कीती चादंण्या जागतात उत्तर हे शोधण्यासाठी
की सुर्य उगवण्यासाठी आहे की मावळण्यासाठी
जागणा-या तुला जागण्याचा अर्थ कुठे माहीत
डोळे झोपण्यासाठी असतात का आसवे गाळण्यासाठी.

कीती किनारे झीजुन गेले सागराच्यां लाटांसाठी
की लाटा सागरासाठी असतात की किना-यासाठी
भरती आहोटीच कारणं कोणाला कुठे माहीत
भरती सागरासाठी असते का सागर भरतीसाठी

कीती कविता केल्या मीही तुझ्या विरहासाठी
की विरहं भेटीसाठी असतो का भेट विरहांसाठी
आठवणा-या तुला आठवणीचां अर्थ कुठे माहीत
आठवणी आठवण्यासाठी असतात की विसरण्यासाठी.

सुधीर .....

मनापसुन .......... मनापर्यतं ..........

आसवांच्या थेबांपरी मी


आज तुझ्या आसवांच्या थेबांपरी मी गळालो
काय दोश माझा मी या वादळांत मिळालो
खरतर दोश तुझा नाही चुक माझीच होती
नेहमी सोडून सत्य स्वप्नांच्या मागे मी पळालो.

अचानक त्या क्षितीजाच्या रगांवर मी भूललो
लागल्या असंख्य ठेचा पण नाही मी सुधरलो
प्रत्येक वळनावर तुझी मागुन हाक होती
खरतर मीच मुर्ख कधी मागे नाही वळलो.

प्रत्येक वळनावर मी मार्ग बदलत रहीलो
तु जवळ आली नाहीस मी दुर जात राहीलो
शेवटी प्रेमाच्या गाठी तुही सोडत गेलीस
मी वेड्यापरी त्या धाग्यांच टोक शोधत राहीलो.

तु जिकंलीस नाही पण मी मात्र हरत राहीलो
तुला दगड म्हणता म्हणता मीच दगड झाहलो
पण ओलावतील पापण्या तुझ्या विरहात जेव्हां
लक्षात ठेव तेव्हा तु हरलीस आणी मीच जिकंलो.

सुधीर .....

मनापासुन .......... मनापर्यतं ...........

मावळत्या आशेवर मी उभा


मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढे
स्वप्नांच क्षितीज सोडून चाललो मी वादळाकडे
वाटल तुझी सोबत असेल तर जिकेन जग सारं
आज तुच पाठ फीरवलीस आता पाहू मी कोणाकडे.

पसरल्या काळोखात मी उभा अर्धा चद्रांकडे
ता-याचं जग सोडून चाललो विझणा-या दिव्याकडे
तु तर विझवुन गेलीस ज्योत माझ्या घरातली
आता उडेड मागु तर मागु कसा या प्रकाशाकडे.

ओघळ्त्या आसवात मी उभा ओल्या किना-यापुढे
उधाणलेल्या लाटाही हसतात पाहुन तुझ्या वेडयाकडे
आठवतय आपल्याला पाण्यात भिजण्याच वेड होतं
आज अश्रुंनीच भिजुन परतलोय मी पुन्हां घराकडे.

तु म्हणतेस मागुन बघ मिळेल तुला प्रेम कोणाकडे
कोण येइल घरात माझ्या काय आहे आता या शुन्याकडे
इथेच शब्दांनाही थाबंवतोय मी आता काय करु कारण
तुझ्या आठवणी पुन्हां आल्या आहेत माझ्या पापण्यांकडे.

सुधीर ......

मनापासुन ....... मनापर्यतं ..........

जिव माझा तुझ्यात होता


जेव्हां हात तुझा हातात होता
तुझ्यासगे लाबं चालत रहायची
आता घराच्या बाहेर पडत नाही
मन घाबरतं कुठेतरी हरवायची.

जेव्हां तुझा हात खाद्यांवर असायचा
मी त्याला आधार समजायची
आता उभी राहताच तोल जातो मझा
धडपडताना तेव्हां तुझा हात धरायची.

जेव्हां तु माझ्या जवळ होतास
तेव्हा सारी सुखं माझ्या जवळ होती
आता काटे विखरलेत अगंणात माझ्या
तेव्हां फ़ुल माझ्या दारात होती.

जेव्हां तु माझ्या काळजात होतास
तेव्हां आत्मा माझ्या मनात होता
आता मी इथे जिवंत प्रेत झालेय
कारणं जिव माझा तुझ्यात होता.

सुधीर .......

मनापसुन ....... मनापर्यतं ........

दगडांना मी फ़ुलं समजतो


दगडांना मी फ़ुलं समजतो
परी मी कवि नाही जनांनो
मी एक वेडा दगड मारणांरा
फुलं समझून दगड मारतो.

मृगजळांनी मी भुमी भिजवतो
अख्खं आभाळ डोळ्यात साठवतो
पसरवुन जाळे पाणवट्यावर मी
चद्रंबिबं माझ्या जाळ्यात पकडतो.

स्वप्नांत पिऊन अमृत अमर होतो
मी चद्रांलाही कधी काजवा समजतो
मला ना पारख ना जाण चागंल्याची
समजुन कल्पवृक्ष बाभळीस कवटाळतो.

दोन शब्दांसाठी सारं विश्व धुडांळतो
नाहीच मिळाले तर अक्षंर गुडांळतो
मी कुठे शब्दांचा सौदागर सा-यापरी
सौदागरापुढे शब्दांचा सौदा मदांवतो.

आज मला कोण इथे ओळखतो
कोंण मला या शब्दांत इथे शोधतो
मी तर एक शब्द खूळा खुळ्यातला
माझा शब्दही मला खुळाच ठरवतो.

सुधीर .....

मनापासुन ........... मनापर्यतं ..........

निवडूगं


त्याने तुला काल एक गुलाब दिलं
आणी तु तोडलेला देट मी उचलला
उगाच कोणाला काटा लागु नये म्हणुन
आणी तो काटा माझ्याच काळंजात रुतला.

रात्रभर तुझाच प्रश्न माझ्या मनाला पडला
रात्रीच्या वाद्ळात दारातला पारीजातही पडला
फ़ुल वेचतानाही तुझ दर्शन नाही व्हायच आता
उरलेल्या फ़ुलांचा सडा तुझ्याच अगंणात पडला.

तु आज आहेस त्याच्या गुलाबात दगं
मझ्या अगंणात उरलाय टोचणारा निवडूगं
कोप-यातला मोगरा असाच सुकुन गेला
कारण तुला जडला आज आबोलीचा छदं.

उगाच नाही पुराच पाणी माझ्या अगंणात आलं
तु इकडे फ़िरकु नयेस म्हणुनच अस झालं
आता मीही लावेन गुलाब आणी आबोली अगंणात
पारीजातकाचं आणी मोग-याच झालं ते झालं.

पण एकही फ़ुल काही तुझ्या वाट्याला नाही येणार
मी त्यानां सुकलेल्या मोग-याची शप्पत देणांर
पारीजातकाच्या फ़ाद्यांपासुन कुपंण बनवतोय मी
तु येणा-या रस्त्यावर निवडूगं पहारेकरी म्हणून ठेवणांर.

सुधीर ..........

मनापासुन ........... मनापर्यतं ..........

साऊली


तु माझी तु मझी म्हणत दिवस गेले
पण मी मात्र तुझा कधीच नाही झालो
एक रात्र गेली तुझ एक स्वप्न गेलं
मी मात्र तुझ्या स्वप्नांत कधीच नाही आलो.

मी तुझ्यासाठी कधीच काही नाही केल
प्रत्येक प्रयन्तात अपयशी मी झालो
खरचं तुला मी कधीच काही नाही दिल
तुझी प्रत्येक इच्छा काळजात साठवत गेलो.

सांर आयुश्य बढाया मारण्यात गेल
नेहमी खोटया स्वप्नांत मी जगत गेलो
आज मागे वळून पाहील तर काहीच नव्ह्तं
प्रत्येक वळनावर काही ना काही हरत गेलो.

फ़क्‍त एक तुझी साऊली माझ्या सोबत होती
पण मी तीचीही साथ नाही देवु शकलो
वाटंल तिच्यासोबत आयुश्य जगेन मी आता
पण तीलाही मी आज काळॊखात घेवुन गेलो.

सुधीर ....

.मनापासुन .......... मनापर्यतं ...........

मी कोण


इथे सारेच कलाकार मी कोण आहे
माझी किमंत काय कोणला जाण आहे
सारेच बहरलेत इथे हिरवळीत हिरव्या
मी कोण, सुकलेलं एक पिपंळ पान आहे.

इथे सारेच कामवाले मीच बेकार आहे
इथे सारेच आवरलेले मीच सुटार आहे
सारेच सुखावलेत इथे शब्दा शब्दांनी
मी कोण, निशब्द शब्दाचा उकार आहे.

इथे सारेच जिकंलेले मीच हरणारा आहे
इथे सारेच हसणारे मीच रडणारा आहे
सारेच हसतात इथे उगाच मोठेपणासाठी
मी कोण, शब्दा शब्दातुन आसवे गाळणारा आहे.


इथे सारेच यशस्वी मीच अपयशी आहे
इथे सारेच र्निदोष मीच अपराधी आहे
सारेच जगतात इथे आनदांत मनभरुन
मी कोण, दुखाःच्या नावेचा खलाशी आहे.

इथे सारेच यात्री मीच वनवासी आहे
इथे सारेच प्रतिसादी मीच अभिलाशी आहे
सारेच तड्पतात इथे ज्या अमुल्य आसवांसाठी
मी कोण, मी त्या आसवांचा जुना प्रवासी आहे.

सुधीर ............

मनापासुन ........... मनापर्यतं ..........

उद्या जगेन


उद्या जगेन उद्या जगेन म्हणून आजवर मरत राहीलास
न पाहीलेल्या भविष्यासाठी वर्तमानात झरत राहीलास
सागं कधी जगलास का ते उद्याच जिवन तु आजवर?
आजही तेच करतोस जे आयुष्यभर करत राहीलास

मर मर मरुन उद्यासाठी तु खूप काही केलंस
तो उद्या आलाच नाही तु तुझ्यासाठी काय केलस?
आज भुतकाळाच्या जखमा पाहून का रडतोस तु
सुखासाठी हजारदा मन मारलस हे तु काय केलस?

एक दिवस तरी सागं जेव्हा नव्हता दु:खाचा चोप
आठवतय का कधी मिळाली शेवटची साखर झोप
अरे तो दिवस आलाच नाही ज्याची तु वाट पाहीलीस
आठवतय का कधी केलीस अखेरची मन मौज

तु म्हणतोस जे केलं त्यामुळे मी आजवर जगलो
आणी एवढ करुनही आजवर ही नाही मी थकलो
घरासाठी दारासाठी संसारासाठी मी खुप काही केलं
हा माझ्यासाठी मी आजवर काही नाही करु शकलो.

आयुष्यभर धावलास तु न पाहीलेल्या उद्यासाठी
तु राहीलास उपाशी नाही केलास आराम जीवासाठी
सागं हा जिवनाचा खेळ होता का नशिबाचा तमाशा
तु जगलास खरा पण कोणासाठी आणि कशासाठी?

सोडणांर आहेस त्या जगासाठी की तुला विसरणा-या घरासाठी
कपाटातल्या तिजोरीसाठी का त्या पोष्टातल्या खात्यासाठी
आता तरी सागं कशासाठी जगलास तु आजवर बोल?
हातातल्या काठीसाठी की डोळ्यावरच्या जाड भिगांसाठी

बघ आजही तरी तुला चीतां पुन्हां त्या उद्याचीच
दंनाच्या लाकडाची आणि शुद्ध वनस्पती तुपाची.

सुधीर..........

मनापासुन.................. मनापर्यतं..................

अस वाटलं


आज अस वाटलं की कोणी
जिवनात माझ्या डोकाउन गेलं
आज अस वाटलं की कोणी
मनात माझ्या पाहून गेलं

माझे डोळे बदं होते त्यावेळी
आणि श्वास जणू यांबला होता
मग असं वाटलं की कोणी
ह्दयाचे टोके कोणी मोजून गेलं

आज अस वाटलं की कोणी
जणू केस माझे कुरवाळून गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू पदराने मला झाकून गेलं

मला आटवतयं उश्याकडे कागंद
होती आणि हातात पेन होता
आज अस वाटलं की मानेखाली
मग उशी कोणी सरकवुन गेलं

आज अस वाटलं की कोणी
जणू दु:ख माझं जाणून गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू डोळे माझे पुसून गेलं

हो ती नक्कीच माझी माय होती
माझी आई आणी कोणी नाही
मग पदराने डोळो पुसले कोणी
आणि देवापुटे हात कोणी जोडून गेलं.

सुघीर......

मनापासुन........ मनापर्यत.........

कल्पनांचा पूर


कल्पनांचा पूर आता ओसरलाय
आता मला कविता सुचत नाहीत
शब्दच जणू काही हरवलेत माझे
कवितेत ते कुठेच दिसत नाहीत.

कवितेसाठी पुन्हां हा बाधं
या धरणाचा तुटावा लागेल
पुन्हां कल्पनांना पाण्यात वाहत
माझ्याकडे यावं लागेल.

कवितेसाठी पुन्हां माझ्या
पापण्यानां ओल व्हांव लागेल
ओघळल्यावर आसवे माझी
विचारंना त्यात भिजावं लागेल.

भिजण्याच्या भीतीने मग
माझेशब्दही माझ्याकडे परत येतील
आल्यावर पूर कल्पनांचा मग
कविताही माझ्या ओसरीला येतील.

सुधीर.......

मनापासुन............ मनापर्यतं .............

पाखरे परत येतील


पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.

होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.

झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.

आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर.

सुधीर......

मनापासुन............ मनापर्यतं...............

चद्रांच्या मिठीत


त्या चादंण्याचां काटा माझ्या मनात रूतलेला
वेडा जिव माझा चद्रांच्या मिठीत लपलेला
मग चद्रंही माझा चादंण्या पाहून लाजलेला
आठवते रात्र पोर्णीमेची चद्रं माझा चिबं भिजलेला

चद्रांला पाहून कुशीत माझ्या चादंण्याना राग आला
पाहून रुप चद्रांच एक तारा जळून राख झाला
त्या पोर्णीमेच्या रात्री मला अनोखा भास झाला
तेव्हांपासुन मी चद्रांचा आणी चद्रं माझा श्वास झाला.

प्रेमाची लहर पाहून वादळंही गार हवा झाली
गारवा साहण्यासाठी मग ढगांनी चादर केली
पहाटेच्या प्रकाशात मग चादंण्याना झोप आली
कळालच नाही चद्रांच्या मिठीत कधी रात्र गेली.

सुधीर......

मनापासुन............ मनापर्यतं...............

एकटा कीनारा


ह्या घनघोर अधांराची आज साथ कोणाला
विखूरलेल्या स्वप्नांची मी पहावी वाट कशाला
एक तुझ्या सोबतीचा आधार होता मला
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मावळत्या सुर्याची ईथे आज आस कुणाला
षितीजाच्या रगांची पहावी कुणी पहाट कशाला
आज तुझीही साऊली हरवली याच साधीप्रकाशात
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

मी दिल्या असख्यं हाका कुणी देईल साद कशाला
किचांळत्या काळजाची कुणी एकेल हाक कशाला
माझ्या सा-या हाका ईथेच विरल्या या वादळांत
आज मीच माझ्या परतीचा एकटा कीनारा.

सुधीर.......

मनापासुन............ मनापर्यतं .............

श्वासालाही उघाणं आलं


आज श्वासालाही उघाणं आलं तिला मिटीत घेताना
चुकत होते ठोके काळ्जाचे तिला मिठीत घेताना
तिचा श्वासही थाबंला आज त्या भेटीच्या वाद्ळांत
जराही नाही लवल्या पापण्या तिला डोळ्यात भरताना.

आज मनालाही उधाणं आलं तिचा हात मुठीत धरताना
थरथरत होते काळीज तिचे कुशीत माझ्या शिरताना
हलकी लहर जरी आली तरी तो वादळांचा भास होता
आज काळजातही चमक्ल्या विजा तिला जवळ घेताना.

मग डोळ्यांनाही उधाण आलं ओठ तिचे पाहताना
मग मान वळवली तिने एका श्वासाचं अतंर असताना
कापत होते ओठ तिचे पून्हां मागे वळून पाहताना
मग ओठांनीच ओठांना शातं केल डोळे बंद असताना.

सुधीर.....

मनापासुन........ मनापर्यत.........

आकांत


ही कविता एका नदीचा आकांत आहे

या अहो घाला घाव कुणी फ़ोडा हा बाधं
होऊद्या मुक्‍त मला पाहूद्या सागरकाठची साजं
नातं आमचं फ़ार जुन युगा युगात महान
मला भेटूद्या सागरा लागली सागराची तहान.

डोगंर द-याचे मला निरोप द्यायचे आहेत
डोळे भरुन त्याला पुन्हां पहायचे आहे
कुशीत शीरुन त्याच्या मनसोक्‍त रडायचे आहे
काही झाले तरी ही सरीता सागराचीच आहे.

तुमचं शिवारं पीकण्यासाठी मी माझी शिवर गाळतेय
तुमची तहान भागण्यासाठी मी कारावास भोगतेय
वा रे माणसा वा हीच तुझी माणूसकी का रे
तुझ्या प्रकाशासाठी मी इथे काळोखात राहतेय.

माझ्या वाटा बदं करुन तुमची घर सजवलीत
ओघळत्या आसवांवर माझ्या तुम्ही पीकं रुजवलीत
आता तरी जाऊदे मला हे जिवन सपंण्याआधी
या फ़ाटक्या चादरीची आता सारी ठिळगं उसवलीत.

हात जोडते पाया पडते बघा आली मी शरण
मुक्‍त करा मला या कोणी तरी तोडा हा धरणं
सपंण्याआधी आता तरी लाभुदे सौभाग्य मला
एक इच्छा माझी येवो मला सुवासीनीच मरण.

सुधीर .....

मनापासुन............. मनापर्यत..........