प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........
Feb 8, 2007
निशब्द
मी दिल्या शब्दा असंख्य हाका शब्द ना मागे वळला कधी
शब्दासाठी झाहलो शब्द्खुळा शब्द ना मज मिळाला कधी
शब्द सकाळ, शब्द मध्यान, शब्द सांज, शब्द निशा कधी
मी गाळली असंख्य आसवे पण शब्द माझा ना पाझरला कधी.
शब्दासाठी हा सारा प्रयास पण शब्दा तो ना कळला कधी
शब्दासाठी हा धडपडता प्रवास पण हात शब्दाने ना धरला कधी
शब्द सागर शब्द कीनारा शब्द वारा मग शब्द वादंळ कधी
मला मिळाल्या असंख्य ठेचा पण शब्द माझा ना ओघळला कधी.
शब्दात माझा जिव गुतंला पण जिव शब्दचा ना जडला कधी
मी लिहील्या असंख्य कविता पण शब्दा त्या ना कळळ्या कधी
शब्द जिवन शब्द संसार शब्द अस्तिव्त शब्द कविता कधी
झालो मी आज निशब्द कवि पण शब्दा हा कवि ना कळला कधी.
आज जिवन माझं प्रश्नचिन्हं पण शब्दास हा प्रश्न ना पडला कधी
शब्दाच्या ओजंळीत श्वास माझा शब्दाने हा जिव ना सोडला कधी
शब्द साउली शब्द आधार शब्द आयुश्य शब्द सर्वस्व कधी
शब्दासाठी मी नेहमी शून्यच होतो पण हा शब्द मी ना खोडला कधी.
सुधीर ......
मनापासुन............... मनापर्यत..................
आसवांचे दिवस आलेत.
कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतो
आता अश्रुंवर प्रेम करण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती माझी घर बसवण्याची
बघ आज माझे घर सोडण्याचे दिवस आलेत.
कधी काळी मी तुझ्यावर मरत होतो
आता खरोखर मरण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती मरणं आजमवण्याची
बघ आज इच्छा पुर्ण करण्याचे दिवस आलेत.
कधी काळी माझ्या कविता हसत होत्या
आता कवितांवर रडण्याचे दिवस आलेत
कागदावर माझ्या शब्दांशीवाय काहीच नव्हते
आज शब्दांसोबत अश्रुंचे डागही आलेत.
कधी मनापासुन मनापर्यंत पोहचत होतो
आज डोळ्यातुन ओघळण्याचे दिवस आलेत
तुझ्या सोडून सागळ्याच्यां डोळ्यात आसवे आहेत
बघ आज तुझ्या सुखाचे नाही माझ्या आसवांचे
दिवस आलेत.
सुधीर .....
मनापासुन ........ मनापर्यंत ........
नाव बुडण्याआधी
नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय या सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.
जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे
आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे
नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.
सुधीर ........
मनापासुन ........ मनापर्यंत .......
प्रेमात दुःखाचे महल
प्रेमात दुःखाचे महल जे सजवले मी
ते एक मन ज्याला दगड बनवले मी
कधी कोणी दुखवु नये तुला माझ्यामुळे
म्हणून जगापासुन तुझे नाव लपवले मी.
ज्या आसवांनी या रत्रीनां जागवले मी
ते दोन डोळे ज्याना नेहमी रडवले मी
पण कधी तुझ्या पापण्या भिजु नयेत
म्हणून जगासमोर या ओठांना हसवले मी.
तुझ्यान्तंर विनाकारण या देहाला जगवले मी
आता हो स्वतःच्या हाकेने मृत्युला बोलावले मी
उगाच तुला त्रास नको माझ्या जाण्या नतंरही
म्हनुन त्या स्मशांनाजवळ घर बनवले मी.
तुझ्या विरहांत उगाचच शब्दांना सतवले मी
तुझा इतिहास लिहिताना कवितांना रडवले मी
तुझ्यामुळे त्यानांही आसवात भिजाव लागत
म्हणुन सारे अश्रुं आता मनात साठवले मी.
सुधीर ..........
मनापसुन .......... मनापर्यंत .............
कीती पाखंरे जळाली
कीती पाखंरे जळाली गुढ हे उलगण्यासाठी
की ज्योत जळण्यासाठी आहे की जाळण्यासाठी
रडणा-या तुला रडण्याचा अर्थ कुठे माहीत
अश्रुं रडण्या-यासाठी आहेत का रडवण्या-रासाठी.
कीती चादंण्या जागतात उत्तर हे शोधण्यासाठी
की सुर्य उगवण्यासाठी आहे की मावळण्यासाठी
जागणा-या तुला जागण्याचा अर्थ कुठे माहीत
डोळे झोपण्यासाठी असतात का आसवे गाळण्यासाठी.
कीती किनारे झीजुन गेले सागराच्यां लाटांसाठी
की लाटा सागरासाठी असतात की किना-यासाठी
भरती आहोटीच कारणं कोणाला कुठे माहीत
भरती सागरासाठी असते का सागर भरतीसाठी
कीती कविता केल्या मीही तुझ्या विरहासाठी
की विरहं भेटीसाठी असतो का भेट विरहांसाठी
आठवणा-या तुला आठवणीचां अर्थ कुठे माहीत
आठवणी आठवण्यासाठी असतात की विसरण्यासाठी.
सुधीर .....
मनापसुन .......... मनापर्यतं ..........
आसवांच्या थेबांपरी मी
आज तुझ्या आसवांच्या थेबांपरी मी गळालो
काय दोश माझा मी या वादळांत मिळालो
खरतर दोश तुझा नाही चुक माझीच होती
नेहमी सोडून सत्य स्वप्नांच्या मागे मी पळालो.
अचानक त्या क्षितीजाच्या रगांवर मी भूललो
लागल्या असंख्य ठेचा पण नाही मी सुधरलो
प्रत्येक वळनावर तुझी मागुन हाक होती
खरतर मीच मुर्ख कधी मागे नाही वळलो.
प्रत्येक वळनावर मी मार्ग बदलत रहीलो
तु जवळ आली नाहीस मी दुर जात राहीलो
शेवटी प्रेमाच्या गाठी तुही सोडत गेलीस
मी वेड्यापरी त्या धाग्यांच टोक शोधत राहीलो.
तु जिकंलीस नाही पण मी मात्र हरत राहीलो
तुला दगड म्हणता म्हणता मीच दगड झाहलो
पण ओलावतील पापण्या तुझ्या विरहात जेव्हां
लक्षात ठेव तेव्हा तु हरलीस आणी मीच जिकंलो.
सुधीर .....
मनापासुन .......... मनापर्यतं ...........
मावळत्या आशेवर मी उभा
मावळत्या आशेवर मी उभा उगवत्या सुर्यापुढे
स्वप्नांच क्षितीज सोडून चाललो मी वादळाकडे
वाटल तुझी सोबत असेल तर जिकेन जग सारं
आज तुच पाठ फीरवलीस आता पाहू मी कोणाकडे.
पसरल्या काळोखात मी उभा अर्धा चद्रांकडे
ता-याचं जग सोडून चाललो विझणा-या दिव्याकडे
तु तर विझवुन गेलीस ज्योत माझ्या घरातली
आता उडेड मागु तर मागु कसा या प्रकाशाकडे.
ओघळ्त्या आसवात मी उभा ओल्या किना-यापुढे
उधाणलेल्या लाटाही हसतात पाहुन तुझ्या वेडयाकडे
आठवतय आपल्याला पाण्यात भिजण्याच वेड होतं
आज अश्रुंनीच भिजुन परतलोय मी पुन्हां घराकडे.
तु म्हणतेस मागुन बघ मिळेल तुला प्रेम कोणाकडे
कोण येइल घरात माझ्या काय आहे आता या शुन्याकडे
इथेच शब्दांनाही थाबंवतोय मी आता काय करु कारण
तुझ्या आठवणी पुन्हां आल्या आहेत माझ्या पापण्यांकडे.
सुधीर ......
मनापासुन ....... मनापर्यतं ..........
जिव माझा तुझ्यात होता
जेव्हां हात तुझा हातात होता
तुझ्यासगे लाबं चालत रहायची
आता घराच्या बाहेर पडत नाही
मन घाबरतं कुठेतरी हरवायची.
जेव्हां तुझा हात खाद्यांवर असायचा
मी त्याला आधार समजायची
आता उभी राहताच तोल जातो मझा
धडपडताना तेव्हां तुझा हात धरायची.
जेव्हां तु माझ्या जवळ होतास
तेव्हा सारी सुखं माझ्या जवळ होती
आता काटे विखरलेत अगंणात माझ्या
तेव्हां फ़ुल माझ्या दारात होती.
जेव्हां तु माझ्या काळजात होतास
तेव्हां आत्मा माझ्या मनात होता
आता मी इथे जिवंत प्रेत झालेय
कारणं जिव माझा तुझ्यात होता.
सुधीर .......
मनापसुन ....... मनापर्यतं ........
दगडांना मी फ़ुलं समजतो
दगडांना मी फ़ुलं समजतो
परी मी कवि नाही जनांनो
मी एक वेडा दगड मारणांरा
फुलं समझून दगड मारतो.
मृगजळांनी मी भुमी भिजवतो
अख्खं आभाळ डोळ्यात साठवतो
पसरवुन जाळे पाणवट्यावर मी
चद्रंबिबं माझ्या जाळ्यात पकडतो.
स्वप्नांत पिऊन अमृत अमर होतो
मी चद्रांलाही कधी काजवा समजतो
मला ना पारख ना जाण चागंल्याची
समजुन कल्पवृक्ष बाभळीस कवटाळतो.
दोन शब्दांसाठी सारं विश्व धुडांळतो
नाहीच मिळाले तर अक्षंर गुडांळतो
मी कुठे शब्दांचा सौदागर सा-यापरी
सौदागरापुढे शब्दांचा सौदा मदांवतो.
आज मला कोण इथे ओळखतो
कोंण मला या शब्दांत इथे शोधतो
मी तर एक शब्द खूळा खुळ्यातला
माझा शब्दही मला खुळाच ठरवतो.
सुधीर .....
मनापासुन ........... मनापर्यतं ..........
निवडूगं
त्याने तुला काल एक गुलाब दिलं
आणी तु तोडलेला देट मी उचलला
उगाच कोणाला काटा लागु नये म्हणुन
आणी तो काटा माझ्याच काळंजात रुतला.
रात्रभर तुझाच प्रश्न माझ्या मनाला पडला
रात्रीच्या वाद्ळात दारातला पारीजातही पडला
फ़ुल वेचतानाही तुझ दर्शन नाही व्हायच आता
उरलेल्या फ़ुलांचा सडा तुझ्याच अगंणात पडला.
तु आज आहेस त्याच्या गुलाबात दगं
मझ्या अगंणात उरलाय टोचणारा निवडूगं
कोप-यातला मोगरा असाच सुकुन गेला
कारण तुला जडला आज आबोलीचा छदं.
उगाच नाही पुराच पाणी माझ्या अगंणात आलं
तु इकडे फ़िरकु नयेस म्हणुनच अस झालं
आता मीही लावेन गुलाब आणी आबोली अगंणात
पारीजातकाचं आणी मोग-याच झालं ते झालं.
पण एकही फ़ुल काही तुझ्या वाट्याला नाही येणार
मी त्यानां सुकलेल्या मोग-याची शप्पत देणांर
पारीजातकाच्या फ़ाद्यांपासुन कुपंण बनवतोय मी
तु येणा-या रस्त्यावर निवडूगं पहारेकरी म्हणून ठेवणांर.
सुधीर ..........
मनापासुन ........... मनापर्यतं ..........
Subscribe to:
Posts (Atom)