प्रत्येकाच्या मनासाठी ........ मनातलल्या प्रत्येकासाठी ........

Mar 24, 2007

मी तिच्यात नव्हतो


मी तिच्यात नव्हतो पण ती माझ्यात होती
तीची नव्हती कधी पण माझी साथ होती


मी आजवर कदीलांच्या उजेडात जगलो
ती चमकणा-या ता-यांच्या प्रकाशात होती


तीचा प्रवास होता मोठ्या महामार्गावरचा
माझी ती बिचारी लहान पायवाट होती


तिच्या स्वप्नांना दोरखडं जखडलेले नेहमी
माझी कधीही सुटणारी निसरति गाठ होती


तीच सुखांशी नेहमी अजोड नातं गुफ़लेल
माझ्या वाट्याला दुःखंच भरमसाठ होती.


नेहमी साखर झोपेची तिची पहाट रोजची
मी डोळे मिटले नाही माझी सदा पहाट होती.


तिच्या ओठी नेहमी हसु उमलायच सुखाच
माझ्या डोळ्यानां नेहमी आसवांची साथ होती


तिने कधी हात जोडले नाहीत कशासाठी देवापुढे
तीच्यासाठी देवळात नेहमी माझीच वरात होती


आज म्हणतेय मी चुकली पण काय फ़ायदा
खरच फ़ार उशीरा तीची ही साद होती.


मी स्मशांन वाटेवर असताना तिला कळाल
आज म्हणे ती दिवसभर देवळात होती.



सुधीर ....

मनापासुन ........ मनापर्यत. .......

संपलो नाही कधीच


संपलो नाही कधीच मी पुरून उरलो होतो
विझलो नाही पुन्हां मी विझुन पेटलो होतो


तुझ्या श्वासाने झालो मी पुन्हां निखारा
त्या राखेत कोळसा मी बनुन पडलो होतो.


तुला वाटले माझी राख झाली ती कधीची
धुरावाटे त्या आभाळास मी भिडलो होतो


कोसळला नाहि तो पहीला पाऊस तेव्हां
पावसाआधी ढगातुन त्यावेळी मी बरसलो होतो


स्वखुशीने तुही भिजलिस सरीत आसवाच्यां
तुझ्या खुशीसाठी मी डोळ्यात साठलो होतो


तुला जाण नाही आसवाच्या चवेची आजही
तो सागर नव्हता त्यात मी विरघळलो होतो.


गंध होता हवेत माझ्या अस्तित्वाचा नेहमी
श्वासावाटे तेव्हां तुझ्या मी काळजात शिरलो होतो.


तुला वाटले मी दुर गेलो आता भेट नाही
मनात डोकावल नाहीस मी मनात मुरलो होतो


जेव्हां ओघळलीस तु... डोळ्यावाटे मीही मुक्‍त झालो
इतके दिवस तुझ्या मी डोळ्यात उरलो होतो.


नेहमीच राहीन जिवंत असा तुझ्या आठवणीत
देह संपला तरी तुझ्या मी देहात साठलो होतो.


तु कणा कणात शोधलस मी क्षणा क्षणात होतो
अगं कुठेच गेलो नव्हतो मी तुझ्यात सरलो होतो.



सुधीर ....

मनापासुन ....... मनापर्यंत .......


Mar 13, 2007

बरसलो आज शब्दांतुन


मी बरसलो आज शब्दांतुन , तीला एकही शब्द ना कळला कधी
मी ओघळलो आज डोळ्यांतुन , तीचा थेबंही ना गळला कधी.

सोडुन मान सन्मान माझा मीच दगडापुढे हात जोडीले
मी कोसळलो दरड होऊन , तीचा एकही बुरुज ना ढळला कधी.

तीची एकही बोली नाही आज लिलावात या माझ्या
मी बसलो बाजार मांडून , तीने भाव माझा ना विचारला कधी.

आयुष्यभर तीच्या कुपंणाबाहेर जागा माझी नित्याची
मी राहीलो कुंपण बनुन , तीने हा निवडूंग अंगणात ना लावला कधी.

सा-याच राती तीच्या चादंण्याच्यां मिठीत गेल्या
मी जगलो काजवा होऊन , तीला उजेड माझा ना दिसला कधी.

आठवतय रोज जाळं तीच पसरवण तळ्यात चद्रंबिबांसाठी
मी राहीलो शिपलं बनुन , माझ्यातला मोती तीने ना शोधला कधी.

मी होतो पाखरु जळणारा ती ज्योत होती मला जाळणारी
मी जळालो पाखरु बनुन , तिला एकही चटका ना लागला कधी.

मी लाचार इतका की आज माझीच कीव मज यावी
मी मला दिले आगीत झोकून , तीचा धुराकडेही जिव ना वळला कधी.

आता मज नकोच तिच्या प्रेमाच्या उसण्या त्या थापा
मी चाललो स्वप्न मोडुन , तीने स्वप्नांतही मला ना सोडला कधी.

सुधीर .....

मनापासुन ....... मनापर्यंत .......

नियतिने सुड हा


मडंळी ही कविता त्या हजारो शेतक-याची कथा आहे
ज्यांनी देहाला सपंवले तरी आत्म्याला शांती नाही.....

आता मी सुटलो आता माझ्या संसारी नाही
आता मी सुटलो आता मी कर्ज बाजारी नाही
आता मी मुक्‍त आहे पण तरी झॊप नाही
माझ्या लेकरांना कोणी इथे कोणी बाप नाही

फ़ाटलं आभाळ सार पण पाण्याचा थेबं नाही
कधी साडंल तर इतक साडंल की थाबांयच नाव नाही
माझी धरणी माय माझ्या म्रृत्यूला कार झाली
कधी पाण्यासाठी कधी भरपाण्यांत बोलायची सोय नाही

सर्जा राजाही माझे उपाशी मग मी का भाकरी खावी
देणेकरांची वरात तलवारीसह रोज दारात माझ्या यावी
आता सरकारी येतात आनिक पचंनामा करुन जातात
आत्म्याच्या मोलाची जाण नाही त्यांनी देहाची किमंत करावी

ती ही रडते आहे पाहून माझ्या सुकलेल्या कणसाकडे
शाळा शीकायचि होती आता जातो तो कोरड्या मळ्याकडे
ती चिमुलकली माझी रोज विहीरीत त्याच डोकावते
बाप गेला तिथुन येइल म्हणून एकटक डोळे तिचे रहाटाकडे.

आज मेल्यानतंरही मि असा कर्जात माझ्या बुडालेला
मुक्‍तीसाठी हा जिव माझा त्या आभाळात उडालेला
सरकार म्हणते कारण दुसरच होत माझ्या आत्महत्तेच
ही माझीच कहाणी नाही कितीकांवर नियतिने सुड हा उगावलेला.

सुधीर ........

तो रस्ता मला पाहून


तो रस्ता मला पाहून आज हसला
म्हणाला प्रेमात बिचारा फ़सला
हो ती हवा आजही तिथेच होती
नेहमी तुझे केस विसकटणारी

तो गाडयाचां गलकाही तिथे होता
रोज तुझ्या माझ्या वादंवर हसणारा
त्या वळणाने मला आवाज दिला खरा
पण आज मी मागे वळून पाहीलच नाही

रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या
आज कोणी माझ्याकडे पाहीलच नाही
आज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मला
आज सारखं चुकल्या सारखं वाटत होत

पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी
आज एक युदध हरल्या सारख वाटत होत
आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकच
रोज दोघं असतात पण आज हा एकच

उत्तर होत जरी एकटाच असलो तरी
तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला
पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज
असतेच ना सागराच्या भरती आहोटीला...

सुधीर .....

नापासुन ......... मनापर्यंत .........

तिने श्राप दिलाय


माझ्या कविताना तिने श्राप दिलाय
की त्या नेहमी अश्याच रडंत रहतील
तो श्राप वरदान ठरलाय माझ्यासाठी
कविता रडल्या तरी डोळे शातं रहतील.

माझ्या कवितंना तिने श्राप दिलाय
की त्या कधीच पुर्ण होणार नाहीत
आज त्या पुर्ण करण्यात वेळ जाते
तुझी आठवण तरी मला येत नाही

माझ्या कवितानां तिने श्राप दिलाय
की त्या कधी कोणाला आवडणार नाहीत
तो श्राप वरदान ठरलाय माझ्यासाठी
सगळ्यानां कळाल तु मला फ़सवल ते
आणी खरोखर ते कोणालाच आवडलेलं नाही

सुधीर ...........

मनापासुन .......... मनापर्यंत ...........

यदां तरि आणा तो


आता पुन्हां आशा आम्हांला त्या स्वप्नांची
भारत जिकेलं विश्व कप ही आस्था या मनाची
आता पुन्हां आम्ही करणार तेच मागचे दावे
काही होऊदे गेल्या वेळी जे झाले ते झाले.

लागली वादळाची चाहूल मनास थांग नाही
पाहुन आमचि तयारी बोलायचि सोय नाही
सारे महारथी आमच्याकडे अर्जुनासारखे
मागे वळू नका आता मागे पहायचे नाही

भले आमचे मन खुपदा इथे तुटले
आम्ही तुम्हांला सांगा कधी एकटे टाकले
आता लढायचे मन लावुन तुम्ही इथे
काही होऊदे उद्या आभाळ जरी हे फ़ाटले.

तुम्ही पैसा कमवा आम्हांला काही नाही
तुम्ही नाव मिळवा आम्हांला खंत नाही
एकच इच्छा आमच्या ह्या भोळ्या मनाची
काही झालं तरी आम्हांला यंदा हरायच नाही

अडीचशे करोड हात करतील प्राथना इथे
मिळेल तेहत्तीस कोटीचा आशीर्वाद तिथे
त्यांची लोक सख्यां नाही तेवढे देव आमचे
जिकणारं ना तुम्ही नवस करणांर आम्ही इथे

क्रुपा करा पण यदां तरि आणा तो विश्वकप
नाहीतर म्हणेल भारताला स्वप्नांळू जग
शेवटी आमच स्वप्नंही तुमच्याच हातात
मन तोडू नका आता नाहीतर बघा मग...

सुधीर ........

रंग बदलेस म्हणून


उद्या तुला भिजवायला समुद्रही कमीच आहे
उद्या तुला रंगवायला इन्द्रंधनुही कमीच आहे
मला माहीत आहे तुझी स्वप्नं फ़ार मोठी आहे
ततुला स्वप्नं पाहण्यासाठी ही रात्रही कमीच आहे.

उद्या तु रंगाना जवळ येवुही देणांर नाहीस
उद्या तु आगीला निट जळूही देणांर नाहीस
आजच शप्पत देउन जाशील मला तु नेहमीची
उद्या तु मला डोळ्यातुन गळूही देणांर नाहीस

"सणाला तरी हसत जा" तु अस म्हणशील"
बाहेरच जग पाहत जा" तु असही म्हणशील
"कोणी लाख दुःखं देउदेत तुला या जगात पण
तु मात्र सुखाने जगत जा" तु असही म्हणशील.

पण यदाच्या होळीला मी ही भिजेन म्हणतोय
यदांच्या होळीला एकदा मी ही रंगेन म्हणतोय
आठवतय एकदाच रंगलो होतो तुझ्या रंगात आता
तुही रंग बदलेस म्हणून शब्दरंगात जगेन म्हणतोय.

सुधीर ....

मनापासुन ....... मनापर्यंत ........

तो क्षण निघून गेला


तो क्षण निघून गेला मी पाहतच राहीलो
बोलायच खुप होत पण निशब्द झाहलो
सारे शब्द जणू रानोमाळ पळून गेले माझे
ओठ उघडलेच नाही डोळ्यात विरघळत राहीलो.

तु समोर होतीस मी कोपरा शोधत रहीलो
तु वळून पाहत होतीस मी वळत राहीलो
आज कळाल कीती कठीण असत प्रेम
काही सपंवुन गेले मी सुरु करण्यात राहीलो.

तुझे डोळे बोलत होते मी पपण्यांत राहीलो
तुझे इशारे खुणवत होते मी बघण्यात राहीलो
कोणीही त्या संधीच सोन केल असत आज
मी 'सोन्या' सोन्यासाठी संधी शोधत राहीलो.

वेळ जात राहीली मी आज वाहत राहीलो
मार्ग सरळ होता मी वळणं बदलत राहीलो
तु माझ्या काळजात सामावुन गेलीस सुध्दा
मी वेडयापरी तुझ्या मनाचं दार शोधत राहीलो.

सुधीर .....

मनपासुन ...... मनापर्यंत .......

एक लढाई हरलो


एक लढाई हरलो म्हणून काय झालं
अजून युद्ध जिकंण तरी बाकी आहे
आज मागे पडलो म्हणून काय झाल
बरेच जण आज माझ्याही मागे आहेत.

कोण म्हणत "ती नाही म्हणून काय झाल
"तिच्या शीवाय इथे ब-याच जणी आहेत"
पण यालाच प्रेम म्हणतात का जगात
तु घाबरु नकोस मी आजही तुझाच आहे.

तु जवळ नसलीस म्हणून काय झाल
तुझ्या आठवणी माझ्यासाठी खूप आहेत
पण आठवणीसोबत जगता येत का इथे
खरच आज हे एक खूप मोठ गणित आहे.

आज मी तुझा असलो म्हणून काय झाल
पण आज तु नक्की माझी आहेस का ?
मी पळवाटा मुळीच शोधत नाही कधी
हा पण तुझे सगळे मार्ग मोकळे आहेत.

सुधीर .......

मनापासुन ....... मनापर्यंत .........

आज झाली पुन्हां माती


आज झाली पुन्हां माती ही जड
आज ओलावली पुन्हां पापण्यांची कड
माझ्या शब्दांनी सुध्दा तिचे डोळे भिजले
आसवांसाठी ही आशी काळजाची तडफ़ड.

आज भिजला पुन्हां तो चद्रं तो माझा
अश्रुंच्या चादंण्यात मग झाला तो वजा
नाही लपवु शकला स्वतःला तो आज
मग घेतली त्याने काही वेळेची रजा

दुःखं समजायला आसवांची का गरज
शब्दही सांगतात आणखी काही बरचं
कस पेलणार वजन शब्दांच त्या मनाला
जड झाली होती माती आज खरंच

सुधीर .....

मनापासुन ......... मनापर्यंत .........

मी देईन कधी हाक


मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?

खूप अडखळीची आहे वाट ही
कधी काट्यांवरी पडेल टाच ही
धडपडताना ह्या खडतर वाटेवर
सांग हात मला तु देशील ना ?

तुझ्या प्रितीचा आहे ध्यास मला
तुझ्या भेटीची आहे आस मला
कधी एकटेपणाचा होईल भास मला
सांग साथ मला तु देशील ना ?

कधी रागवेन मी तुझ्यावरती
कधी भांडेन मी तुझ्या संगती
कधी येईल दडपण या मनावरती
सांग कुशीत मला तु घेशील ना ?

मी देईन कधी हाक तुला प्रिये
सांग साद मला तु देशील ना ?

सुधीर .....

मनापासुन ......... मनापर्यंत .........

राहीलयं काय आता


लाख वाटल लपवाव जगापासुन या मनाला
तरीही आज तुझी कहाणी कळाली या जगाला
सगळ्यांनी वाचल दुःखं या प्रत्येक शब्दांतुन
काय लपवु राहीलयं काय आता लपवायला.

लाख मन सागंत होत कुठेतरी थाबांयला
वळण निघुन गेली नाही जमल वळायला
सारेच धावले एकदम सुखाच्या मागे
मी काय करु मला नाही जमल पळायला.

आज काय झाल तुला उगाच असं रडायला
कुठे चुकल्यासारखं नाही ना वाटत मनाला
अशी कीती सुखं तुझ्या पदरात पडली
जी कारणं होती तुझी तेव्हा मला सोडायला.

आजही कुठे जमतय मला तस जगायला
एक वणवा कमीच होती मला जळायला
कालच्या पुरातून कसाबसा वाचलो मी पण
डोळ्यातल्या पाण्यात नाही जमत पोहायला.

सुधीर ......

मनापासुन............... मनापर्यत..................

एक आठवण चाळून घे


नाव बुडण्याआधी किनारा पाहून घे
जो नेईल नदीपार असा सहारा शोधुन घे
माझा मृत्यू इथेच लिहीलाय याच सागरात
मला शेवटाचा एकदा मिठीत सामावुन घे.

जेवढं रडायचं आहे आज रडून घे
ज्या शपता सोडायच्या त्या सोडून घे
आठवणीशीवाय काहीच नाही माझ्याकडे
आणखी काही हवं असेल तर मागुन घे

आज तुझी प्रत्येक इच्छा पुर्ण करुन घे
आज शेवटच माला डोळे भरुन पाहून घे
उद्या तुझ्यावर कोणा दुस-याचा हक्क असेल
जे काही विसरायच असेल ते विसरुन घे

नाहीच जुळले तर शब्द जुळूवुन घे
सगळ्या कविता आज पुन्हां वाचुन घे
तुझ्या आठवणी जखमांवर मीठ चोळतात
जाताना तुझी एक एक आठवण चाळून घे.

सुधीर ........

मनापासुन ........ मनापर्यंत .......